आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मे : निसर्ग संवर्धनाची सुरुवात आपल्या घरापासून
दरवर्षी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आपल्याला याची जाणीव करून देतो की निसर्ग हा आपल्या जीवनापासून वेगळा नाही, खरंतरं तो आपल्या अस्तित्वासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सुपीक माती, जंगल, नद्या, पक्षी, कीटक आणि वन्यजीव हे सर्व मिळून मानवाच्या जीवनाला आधार देणारे संतुलित वातावरण निर्माण करतात. मात्र वाढते प्रदूषण आणि अयोग्य कचरा व्यवस्थापनामुळे ही जैवविविधता गंभीररित्या धोक्यात आली आहे. पर्यावरणाच्या हानीस कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे वाढणारा कचरा. रस्ते, टेकड्या आणि नदी काठावर फेकला जाणारा प्लास्टिक कचरा अखेरीस जलाशय आणि नैसर्गिक अधिवासांमध्ये पोहोचतो, ज्यामुळे प्राणी, पक्षी आणि जलचर जीवांना मोठा धोका निर्माण होतो. कचरा जाळणे किंवा रस्त्यावर टाकणे यामुळे माती आणि हवेचे प्रदूषण वाढते. ज्यामुळे शहरे आणि गावे या दोन्ही परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. यातील सकारात्मक बाब म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण करण्याची सुरूवात आपल्या स्वतःच्या घरापासून सुरू होऊ शकते. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील कचऱ...