उन्हाळा - स्वयंसेवी उपक्रमांसाठी सर्वोत्तम काळ
स्वयंसेवी संस्थांनी उन्हाळ्याच्या दिवसांचा सदुपयोग प्रभावीपणे करत प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सलग स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत. शनिवार-रविवारची सकाळच्या वेळेला समाजोपयोगी उपक्रमांचे स्वरूप प्राप्त झाले असून पुण्यात विविध गट नागरिकांना या मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेत आहेत. यावर्षी एपीसीसीआय ने मायप्रकृती,बीपीटी सेवा,टुगेदर इंडिया आणि क्लीनअप इंडिया यांसारख्या संस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. उन्हाळा हा सहसा सुट्टया आणि निवातंपणाचा काळ मानला जातो,मात्र समाजासाठी काहीतरी करण्यासाठी हाच सर्वांत प्रभावी रूतू ठरू शकतो. निरभ्र आकाशामुळे शहरातील स्वच्छता मोहिमांसाठी हा उत्तम हंगाम मानला जातो. वेताळ टेकडी,तळजाई टेकडी आणि बाणेर हिल्स सारख्या निसर्गरम्य ठिकाणांपासून ते मुळा-मुठा नदी काठपर्यंत किंवा आपल्या परिसरातील रस्त्यांपर्यंत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. विशेषत: तरूण वर्ग या मोहिमेत उत्साहाने सहभागी होत आहेत.आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी घरात वेळ घालवण्याऐवजी अनेक युवक टेकड्या,नदीकाठ आणि सार्वजन...