लोकसभागाची ताकद दर्शवणारा स्वच्छता उपक्रम
झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था,वेगाने होणारा विकास,वाढते शहरीकरण,वस्तू आणि सेवांचा वाढणारा वापर यामुळे सर्वात भेडसावणाऱ्या प्रश्नांपैकी प्रमुख म्हणजे वाढणारा कचरा.या समस्येची व्याप्ती इतकी वाढत चालली आहे की,फक्त प्रशासनच नव्हे तर प्रत्येक नागरिकाने सक्रीय होण्याची वेळ आली आहे.याबाबत बहुतांश लोकांना जागरूकता नसते,कारण आपल्या नजरेसमोरून कचरा गेला की त्याचे काय होते हे आपल्याला माहित नसते.बाहेर साचणारा कचरा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे विपरीत परिणाम आपण भोगत असलो तरी याबाबत पुरेशी माहिती लोकांपर्यंत पोहचली नाहीये. परंतु प्रत्येक नागरिकाने सजग होऊन छोट्या कृतीतून जर सुरूवात केली तर इतरांमध्येही जागरूकता निर्माण होऊन त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो आणि त्यामध्ये परिसरातील सर्व नागरिक सहभागी झाले तर त्याची व्याप्ती आणखी वाढू शकते. याचाच प्रत्यय सध्या आयडीयल कॉलनीमध्ये येत आहे.अशाच एक जागरूक नागरिक म्हणजे प्रज्ञा शेठ.त्यांनी ओल्या कचऱ्यापासून सुरूवात केली आणि थोड्या दिवसातच स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या संपूर्ण ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतामध्ये होऊ लागले.त्यानंतर त्यांनी आपले लक्ष सु...